९ सप्टेंबरला होणारी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक इंटरेस्टिंग होणार आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार आहेत सी. पी. राधाकृष्णन तर इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत बी. सुदर्शन रेड्डी हे दोघेही दक्षिणेतले नेते आहेत.त्यामुळे दक्षिणेतल्या पक्षांचे नेते कुणाच्या बाजूनं कौल देणार, ते पाहणं महत्त्वाचं असेल.त्याबरोबरच भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.त्यासाठी महाराष्ट्रातल्या नेत्यांनाही फोनाफोनी सुरू झालीय.