रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. तर वाऱ्याचा वेग ताशी 40 किमी राहण्याचा अंदाज आहे.काल रायगडच्या श्रीवर्धनमध्ये मुसळधार पाऊस झालाय. वालवटी गावातील बंदर मोहल्ला भागात पाणी शिरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळालं आहे.पावसामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसतंय..