केंद्र‑राज्य सरकारच्या धोरणांविरोधात आणि कंपन्यांच्या अटींविरोधात राज्यातील ८५ हजार कृषी सेवा केंद्रांनी बेमुदत संप पुकारलाय. या संपाचा थेट फटका बळीराजाला बसतोय.खतं‑बियाण्यांसाठी शेतकरी वणवण करत असताना खतविक्रेते संपावर गेल्यामुळे परिस्थिती अजूनच गंभीर झाली आहे. शेतीचा हंगाम तोंडावर असताना सरकार तोडगा काढणार की शेतकरी संकटात अडकणार? पाहुयात या रिपोर्टमधून.