स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महायुतीतील राष्ट्रवादीच्या आमदाराने भाजपवर मोठा आरोप केला. मला पाडण्यासाठी भाजपने पाच कोटी रुपये देऊन पुतण्याला डमी उमेदवार म्हणून उभे केल्याचा आरोप आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केला. आगामी निवडणुकीत भाजपला एकही जागा देणार नसल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी हे महायुतीतील पक्षच एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे.