हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पावणेतीन लाख हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. मात्र, महसूल विभागाचे कर्मचारी घरी बसूनच पंचनामे करत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कृषिमंत्र्यांनीही पाहणी न केल्याने शेतकरी नाराज आहेत.