पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करताना आक्रमक असलेले राहुल गांधी त्यांच्या सुरक्षेबाबत मात्र गंभीर नसल्याचे दिसत आहे. सीआरपीएफने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून राहुल गांधी सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन करत असल्याची तक्रार केली आहे. राहुल गांधी खरंच त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर नाहीत का? सीआरपीएफची नेमकी तक्रार काय आहे? या विशेष रिपोर्टमधून अधिक माहिती.